मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

प्रगल्भता म्हणजे काय?(what is maturity?)

· प्रगल्भता म्हणजे काय? · (what is MATURITY) · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता. · प्रगल्भता म्हणजे ...
अलीकडील पोस्ट

Hambirrao mohite: the great maratha worrier ....... सरसेनापती हंबीरराव मोहिते

कराडमधील तळबीड या गावची पाटीलकी सांभाळणाऱ्या मोहिते घराण्यात इसवी सन १६४० साली हंसाजी मोहितेंचा जन्म झाला झाला होता. हंसाजींचे वडील संभाजी मोहिते शहाजी राजांच्या सैन्यात सहहवालदार होते. संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला होता तर हंसाजींच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या. इसवी सन १६७४ साली आदिलशाही सरदार बहलोलखान याच्यासोबत लढाईत सेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले. सेनापती पडल्याची वार्ता कळताच प्रतापरावांच्या फौजेत सरदार असलेल्या हंसाजी मोहिते यांनी सर्व सैनिकांचे मनोबल ढासळू न देता त्यांच्यात हिंमत निर्माण केली आणि बहलोल खानावर आक्रमण करून त्याला विजापूर पर्यंत पिटाळून लावले. हंसाजींच्या या पराक्रमाने शिवाजी महाराजांना त्यांच्यात शहाणा, सबुरीचा सेनानी दिसला. महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना हंबीरराव हा किताब दिला आणि आपला सेनापती म्हणून निवडले. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागात स्वारी करून मोठी लूट ज...

छत्रपति शिवाजी महाराज जावळीच्या खोऱ्यात 🚩

# छत्रपति_शिवाजी_महाराज_जावळीच्या_खोऱ्यात 🚩 जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्‍वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे! तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!’’ जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्‍या चंद्रराव मोर्‍यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्‍वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्‍यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोर्‍यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. ‘चंद्रराव’ हा मोर्‍यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोर्‍यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे ‘चंद्रराव’ झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोर्‍यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही...